सध्या नित्य नूतन हिंडणे सुरु आहे. एक चांगला group पण तयार झालाय. नुकतीच केंजळगडची मोहीम सुद्धा झाली (त्यासंबंधीची post लवकरच टाकतोय). जमलेला group, भटकंती आणि blog बहुतेक या सगळ्याच्या एकंदर परिणाम कि काय ? माहिती नाही, पण आमच्या सौ. ना कविता एक सुचली. ती इथे share करतोय. तुमचाही अभिप्राय जरूर कळवा.
या मातीशी आमुचे नाते, दऱ्या कड्यांची ओढ सांगे |
निसर्गा संगतीच आम्हां, स्वर्ग सुखाची चाहूल लागे ||
हरपून भूक तहान, विसरून देहभान |
गाठणे गडमाथा, हाच आमुचा सन्मान ||
केवळ भटकणे अन फिरणे, जरी असे हाच छंद |
धडपडूनही न थांबणे, हाच आमुचा आनंद ||
सह्यभ्रमंतीच्या ह्या क्षणांची, करितो मनी साठवण |
तरीही क्षुधा शांत न होई, फिरुनी येई आठवण ||
महाराष्ट्राचा इतिहास सांगत, सह्याद्री असे उभा खडा |
त्याला भेटून येताना मात्र, ओलाविती आमुच्या नेत्र कडा ||
शिवछत्रपती दैवत आमुचे, आम्हीच त्यांचे मावळे खरे |
शिव-शंभूचे पराक्रम सांगत, साद देती सह्यशिखरे ||
- सौ. अर्जिता आदित्य गोखले.
No comments:
Post a Comment